उजनीतून भीमेत विसर्ग वाढविला

उजनी धरणातून सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासह नदीकाठच्या योजनांसाठी सोडलेल्या पाण्याचा विसर्ग सायंकाळी 8100 क्युसेक इतका करण्यात आला आहे. 6500 क्युसेक पाणी सांडव्यातून सोडले जात आहे तर 1600 क्युसेकने पाणी वीज निर्मितीचे आहे.
सध्या भीमा नदी कोरडी असल्याने पाणी वेगाने पुढे सरकावे यासाठी पाण्याचा विर्सग सकाळपासून वाढविला जात होता. हे पाणी पंढरपूरला पोहोचण्यास तीन दिवस लागतील तर सोलापूरच्या औज बंधारा गाठण्यास किमान आठ दिवस लागणार आहेत. धरणात आता उपयुक्त साठ्या वीस टीएमसीचा साठा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!