माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य नातवाने आजोबांला संपवले.
छत्तीसगड राज्यात एक भयंकर घटना घडली आहे. आताच्या जगामध्ये काय काय वार्ताहर घडू शकतात. याचे जागते उदाहरण छत्तीसगड येथे घडले आहे. छत्तीसगडच्या दुर्गूकोंदल गावामध्येही घटना घडून आली आहे. हे गाव भानुप्रतापपुर येथून जवळ आहे. येथे एका नातवाने आपल्या वयोवृद्ध आजोबाची हत्या केली आहे. लाकडी दांडक्याने मारून ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्या वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव सुन्नू राम आहे. सुन्नू राम यांचे वय ६० वर्षे इतके होते. आपल्या आजोबांची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव सुरेश आहे. जमिनीच्या वादाने ही हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादामध्ये देशात अनेक घटना घडत असतात, ही त्यापैकी एक आहे. आरोप सुरेश साध्य पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला अटक केली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश छत्तीसगड राज्यातील दुर्गूकोंदल या गावाचा रहिवाशी होता. आपल्या आजोबांशी झालेल्या जमिनीच्या वादामध्ये त्याने हे पाऊल उचलले. दरम्यान, घटनेच्या अगोदर घेण्यात आलेल्या जमिनी संदर्भातील बैठकीमध्ये आरोपी सुरेशने त्याच्या आजोबा सुन्नू राम यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असे सागण्यात आले होते. बैठकी दफरम्यान झालेल्या वादाचा सूड आरोपी सुरेशने घेतला. संध्यकाळी सुन्नू राम झोपण्यासाठी शेतात गेला असता, आरोपी सुरेशने त्या गोष्टीचा फायदा घेत आजोबा सुन्नू रामची हत्या केली.
सुन्नू राम शेतात झोपण्यासाठी जात असता सुरेशने लाकडी बांबू त्याच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली. इतकेच नव्हे तर या कृत्यानंतर आरोपी सुरेश घराकडे परतला. सकाळी सुन्नू रामची वाट बघत असता. खूप वेळ झाला, तरी अद्याप सुन्नू राम घरी आले नाही? हा प्रश्न कुटुंबियांना पडला असता. सुन्नू राम यांचा मुलगा त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला. तेथे त्याला सुन्नू राम मृत अस्वस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती त्यांनी जवळच्या दुर्गूकोंदल पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी यावर शोध कार्य सुरु केले.
यावर शोध कार्य करत असताना पोलिसांच्या नजरेस आले की, हत्या करणारा आरोपी नक्कीच येथील स्थानिक आहे. दरम्यान पोलिसांना जमिनीच्या वादाबाबत माहितीव पडले. या गोष्टीवर शोध केला असता त्यांना सुन्नू रामच्या नावाविषयी माहिती पडले. त्याने दिलेल्या धमकी विषयी माहिती पडताच, त्याला पोलीस स्थानकात आणले गेले. शेवटी, आरोपी सुरेशने गुन्हा मान्य केला आहे. त्याला न्यायलयात सादर करण्यात आले आहे. तसेच कारावास दिला गेला आहे. जमिनीच्या वादावरून घडलेले देशात हे पहिले प्रकरण नाही. असे अनेक प्रकरण घडत असतात.