83 वर्षीय आज्जीबाईंकडून विठोबाला सव्वा तीन किलो चांदी
जगत्देव म्हणून ख्याती पावलेल्या श्री विठ्ठलाचे भक्त ग्रामीण भागात सर्वाधिक आहेत. म्हणून त्याला गोरगरीब व कष्टकरी ,शेतकर्यांचा देव म्हणून ओळखले जाते. येथे येणारा भक्त देवाला काही मागत नाही तर त्याच्या पायावरच आपल्या कडील काही रक्कम अथवा वस्तू ठेवतो. अगदी हक्काने संक्रांतीस येतो आणि तिळगूळ देतो आणि याच बरोबर शेतात पिकलेले धान्य ही अपर्ण करतो. अशा या विठुरायाच्या चरणावर अहमदनगर जिल्ह्यातील भायगावच्या श्रीमती आसराबाई अजर्र्ुन गोसावी या 83 वर्षीय आज्जीबाईंनी सव्वा तीन किलो चांदीच्या वस्तू बुधवारी अपर्ण केल्या आहेत.
देवाच्या शेजारती वेळी लागणार्या सर्व वस्तू चांदीत तयार करून आसराबाईंनी श्री विठ्ठल मंदिरात देवू केल्या आहेत. यात आरती, गुलाबदाणी, अत्तरदाणी, रांगोळीपात्र, माता रूक्मिणीकडील षटपाळ, लहान रांगोळी पात्राचा समावेश आहे. या सर्व वस्तूंचे वजन 3 किलो373 ग्रॅम इतके आहे. या चांदीच्या वस्तू देवाच्या पायावर बुधवारी अपर्ण करताना मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच गोसावी कुटूंबिय उपस्थित होते.